Sunday, 13 January 2019

जीवनात कधी कधी
               अश्रूंच्या वाहतात  धारा
जीवनात कधी कधी
               हासवांच्या पडतात गारा

जीवनात कधी कधी
              दु:खाचा समोर असतो सागर
जीवनात कधी कधी
              सुखाने भरलेली दिसते घागर

जीवनात कधी कधी
               कष्टाच्या आगीत होरपळावे
जीवनात कधी कधी
               आरामाच्या खुशीत निजावे

जीवनात कधी कधी
                निराशेचा येतो घोर अंधकार
जीवनात कधी कधी
              आशेचा लख्ख प्रकाश असतो फार

जीवन हे सुख-दु:ख, आशा-निराशा
याचाच सारा खेळ आहे
जीवन म्हणजे अजून काय असणार
जीवन म्हणजे सुख दु:खाचा मेळ आहे.
शब्द•••♡•••


शब्दच असतात ते       1
 कधी हसवतात तर
  कधी रडवतात अन
    या जगात स्वताच
      अस्तित्व टिकवतात
        शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                 2
जगण्यास आशेची,
  उमीद दाखवतात
  अन प्रत्येक वळनावर
   खूप आदर्श घडवतात
     शब्दच असतात ते

शब्दच असतात ते             3
समाजाच्या अबोल समस्या
 काव्यातून उमटवतात अन
  लोकांच्या मनावर स्पूर्तिने बिंबवतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                    4
कधी त्याच्याकडून तर
 कधी तिच्याकडून ते प्रेमाचे
  तिन अनमोल शब्द म्हणवतात
   शब्दच असतात ते

शब्दच असतात ते              5
कधी आपल्यास परक तर
 कधी परक्यास जवलतात अन
  स्पर्देच्या युगात स्व:ताची  
   स्व:ताशी शर्यत जुपंतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                 6
कधी ग्रंथातुन तर
 कधी काव्यातून आपणास
  नव चैतन्याची शिकवण देतात
   अन उत्तम श्रवणाने आपल्
    अस्तित्व टिकविन्यास मदत करतात
     शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                    7
कधीही पूर्णविराम नसनारे
 या जगात स्व:ताच अखंड
  स्वतंत्र गाजविनारे
   शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                8
कधी वचने तर
 कधी आव्हाने देतात
  अन स्वतःची फसवणूक करुण
   शब्दास खोट ठरवतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते            9
कधी प्रारंभ तर कधी
 समारोह करतात अन
  संस्कृती च्या रीतीने
   आभार प्रदर्शन घडवतात

मुसळधार पावसामुळे
चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात
क्षणिक वाटू लागले
की या काळोख्यात
त्या पावसाच्या थेंबांच्या
रुपात जमिनीवर पडू लागले
विजेच्या लख्ख असा
प्रकाश जणू त्या थेंबांची
शोभा वाढवू लागली
नि ढगआपला  गदगडाट आवाज करून
जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या
वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय
सोबतच माती स्वःताचा सुगंध
अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते

Sunday, 21 October 2018

नको आता ती पावसाची सरी वर सर वर भिजवणारी,
आहे ती पुरे आहे सर ऐकांतात साथ देणारी,
नको तो लाजरा चंद्र
आता ती रात्र चांदण्यांची सुखावणारी,
पुरे ती निखळता तिची उमटणारी गालावरची,
नकोत त्या कळ्या नकोत
त्यांचे कोमल गंध,
पुरे ती बट रेंगाळलेली गालावर
मनाला मोहून फक्त अतूट नाते निर्माण करणारी....

Saturday, 22 September 2018

आयुष्याचे धागे...
आज म्हटलं आयुष्य  विणायला घेवूयात,  जमतंय का ते बघुयात 
वाटल अगदी सोपं असेल रंगसंगती जमून आली कि  सुंदर दिसेल 
प्रश्न पडला धागे कोणते कोणते  घ्यायचे?   एक दोनच कि सगळे वापरायचे ?
मग ठरवलं फक्त छान छान धागे घेवू, एक काय, दोन काय सगळेच एकमेकात विणू
सुरवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम 
म्हटलं छान आहे हा धागा, धाग्याने या विन राहील कायम 
मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बऱ्याच भरल्या  जागा, 
थोड थोड  आयुष्य  आकार घेवू लागलेलं पण, अजूनही बरचस विणायच बाकी राहिलेलं, 
एक एक धागा आशेचा, सुखाचा  आणि आनंदाचा घेतला 
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला, हळू हळू विन घट्ट  होत होती. 
तरीदेखील कसलीतरी कमी होती, मग घेतला एक नाजूक प्रेमाचा धागा 
धागा होता सुंदर आणि रेशमी, धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.
एक एक घेतला धागा यशाचा,  किर्तीचा आणि अस्तीत्वाचा  आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश मिळाला, 
सगळेच धागे फार सुंदर आणि प्रसन्न होते, तरीदेखील त्याचातल्या एकसारखे पणाने   मन खिन्न होते. 
थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच, म्हटलं बघुयातरी याचमुळे आपल आयुष्य होतंय का सुरेख 
मग घेतला एक धागा दुखाचा, एक निराशेचा, एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा 
हे चारही धागे विनता एकमेकांमध्ये, आयुष्याला खरा अर्थ लाभला त्याचमुळे 
 दुक्खाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय  आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय  जय नाही 

आणि महत्व पटलं आहे सर्व धाग्याचे  आज मला, सुंदर सुंदर धाग्यानीच फक्त मजा नसते आयुष्याला 

Thursday, 19 July 2018


एकांतात मज
भास तुझा होतो,
भासामध्ये तुझा
सहवास होतो;

हळूवार मग
अंधारतो दिस,
काळोखात तुझा
चेहरा दिसतो;

एकांतात बोलू
लागते शांतता,
शांततेत तुझा
स्वर निनादतो;
अश्रु डोळयांपर्यंत येउन थिजतात आणि पापणीआड दडतात
भावनांची किंमत जेव्हा ना ओठ सांगु शकतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
घाबरुन कासाविस होतो जिव,प्राण जेव्हा कंठात अडकतात
वाळवंटातील मृगजळाप्रमाणे क्षण जेव्हा मला छळतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
एकटया अशा या वाटेवर,क्षितीजापर्यंतच्या शांततेत
आयुष्याच्या समुद्रात लाटा मला जेव्हा भरकटत नेतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
वरदान जेव्हा शाप ठरतात,स्वप्नांना मातीत पुरतात
आधारांचे झरेही मग कधी क्षणात आटतात
हे शब्दच मग मला जगवतात,तॄषार्त मनाला धारांनी भिजवतात
आयुष्याच्या संध्याकाळी नव्या उद्याची आस जागते
        तेव्हा शब्द देतात मला साथ.....