Thursday, 11 October 2012

आठवणी...


काळोखात मिट्ट गुडूप झालेल्या,
आपल्या सावल्या...
जेव्हा आपल्याच अंगावर येऊ पाहतात,
आठवणींच्या वाटेवरुन..
आपल्या तना-मनात शिरतात,
काहीच सुचत नाही..
पण एवढं नक्की,
आठवणींच्या वाटा..
नेहमी काळजातूनच पुढे जातात..
रक्ताचे पाट वाहत राहतात..
हुंदक्यांचे घाटांवर घाट चढत राहतात,
तळवे ओलसर होत राहतात..
झंझावताच्या लाटांच्या लाटा,
खेचत राहतात्..आतपर्यंत्..खोल खोल..
आणि पालापाचोळ्यासारखं भिरकावून देतात..
उष्ण उष्ण श्वास काळजात भरुन राहतात,
पळसाची फुले फुलत राहतात...
धुवांधार पावसात,
कोसळणार्‍या ,कडाडणार्‍या विजा ..
मन पित राहत,
त्या पिण्याला विरोध करण्याच बळ..
ते मात्र त्याच्यात नसतं,
म्हणूनच..
आठवणींच्या देशात जाऊच नये कधी,
तुटलेले धागे सांधूच नये कधी..
जखम भरलेली असते..
पुन्हा ती उघडी करुच नये कधी.. ...

No comments:

Post a Comment