Sunday 21 October 2018

नको आता ती पावसाची सरी वर सर वर भिजवणारी,
आहे ती पुरे आहे सर ऐकांतात साथ देणारी,
नको तो लाजरा चंद्र
आता ती रात्र चांदण्यांची सुखावणारी,
पुरे ती निखळता तिची उमटणारी गालावरची,
नकोत त्या कळ्या नकोत
त्यांचे कोमल गंध,
पुरे ती बट रेंगाळलेली गालावर
मनाला मोहून फक्त अतूट नाते निर्माण करणारी....

Saturday 22 September 2018

आयुष्याचे धागे...
आज म्हटलं आयुष्य  विणायला घेवूयात,  जमतंय का ते बघुयात 
वाटल अगदी सोपं असेल रंगसंगती जमून आली कि  सुंदर दिसेल 
प्रश्न पडला धागे कोणते कोणते  घ्यायचे?   एक दोनच कि सगळे वापरायचे ?
मग ठरवलं फक्त छान छान धागे घेवू, एक काय, दोन काय सगळेच एकमेकात विणू
सुरवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम 
म्हटलं छान आहे हा धागा, धाग्याने या विन राहील कायम 
मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बऱ्याच भरल्या  जागा, 
थोड थोड  आयुष्य  आकार घेवू लागलेलं पण, अजूनही बरचस विणायच बाकी राहिलेलं, 
एक एक धागा आशेचा, सुखाचा  आणि आनंदाचा घेतला 
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला, हळू हळू विन घट्ट  होत होती. 
तरीदेखील कसलीतरी कमी होती, मग घेतला एक नाजूक प्रेमाचा धागा 
धागा होता सुंदर आणि रेशमी, धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.
एक एक घेतला धागा यशाचा,  किर्तीचा आणि अस्तीत्वाचा  आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश मिळाला, 
सगळेच धागे फार सुंदर आणि प्रसन्न होते, तरीदेखील त्याचातल्या एकसारखे पणाने   मन खिन्न होते. 
थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच, म्हटलं बघुयातरी याचमुळे आपल आयुष्य होतंय का सुरेख 
मग घेतला एक धागा दुखाचा, एक निराशेचा, एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा 
हे चारही धागे विनता एकमेकांमध्ये, आयुष्याला खरा अर्थ लाभला त्याचमुळे 
 दुक्खाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय  आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय  जय नाही 

आणि महत्व पटलं आहे सर्व धाग्याचे  आज मला, सुंदर सुंदर धाग्यानीच फक्त मजा नसते आयुष्याला 

Thursday 19 July 2018


एकांतात मज
भास तुझा होतो,
भासामध्ये तुझा
सहवास होतो;

हळूवार मग
अंधारतो दिस,
काळोखात तुझा
चेहरा दिसतो;

एकांतात बोलू
लागते शांतता,
शांततेत तुझा
स्वर निनादतो;
अश्रु डोळयांपर्यंत येउन थिजतात आणि पापणीआड दडतात
भावनांची किंमत जेव्हा ना ओठ सांगु शकतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
घाबरुन कासाविस होतो जिव,प्राण जेव्हा कंठात अडकतात
वाळवंटातील मृगजळाप्रमाणे क्षण जेव्हा मला छळतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
एकटया अशा या वाटेवर,क्षितीजापर्यंतच्या शांततेत
आयुष्याच्या समुद्रात लाटा मला जेव्हा भरकटत नेतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
वरदान जेव्हा शाप ठरतात,स्वप्नांना मातीत पुरतात
आधारांचे झरेही मग कधी क्षणात आटतात
हे शब्दच मग मला जगवतात,तॄषार्त मनाला धारांनी भिजवतात
आयुष्याच्या संध्याकाळी नव्या उद्याची आस जागते
        तेव्हा शब्द देतात मला साथ.....