आपल्या आयुष्यात जागोजागी पूर्णविराम आहेत
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
काळाच्या ओघाबरोबर
फक्त क्षितिजापर्यंत जाणारी
ह्याच रेघेत भावना अन प्रसंग
गुंफले गेले आहेत
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत दिले जाणार आहेत
फक्त क्षितिजापर्यंत जाणारी
ह्याच रेघेत भावना अन प्रसंग
गुंफले गेले आहेत
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत दिले जाणार आहेत
No comments:
Post a Comment